श्री.नारायण मंत्री – मारवाडी शेतात गडी-माणसांसोबत काम करित होते. त्यांनी मला दुरूनच आवाज देऊन थांबविले. त्यांनी मला पाणी प्यायला दिले, मी घाट पीयीपयीच सायकल हातात घेऊन चढून आलेलो होतो . माझाही घसा सुकला होता. पाणी पिल्यावर बरे वाटले. संपूर्ण ३० मैल प्रवासात भेटलेली पहिली ओळखीची व्यक्ति,त्यांनी मला खूप धीर दिला. ते म्हणाले घोड्यावारच्या प्रवासासारखा सायकल प्रवास तसा बराच आरामाचा, दोन -चार पायडल मारले, उतारावर तर पायडल न मारता नुसते सीटवर बसायचे.थोडी विश्रांतीही मिळाली. तलाववाडीत रस्ता उताराचाच होता , वर चढून दोन- तीन वळणे पार केली की आमराई ,भोपळी -फुलांचा मळा नंतर खंडोबाचे देऊळ,येथे रथसप्तमीला मोठी यात्रा असते. त्यानंतरचा लहान ओढा ओलांडला की आलेच , ‘ मेडशी ‘ गांव . मोटार स्टॅंडवरून डावीकडे वळायचे, पुढे चक्कीजवळून डावीकडे वळून श्रीमती धनाबाई आंबेवालीच्या घरामागेच आमचेे घरी पोहोचलो. सायकल भिंतीला लावली,आत गेलो. ति. साै. आईसाहेबांना मी दिसताच खूप आश्चर्य वाटले. तू एकटाच ? कसा आलास ? सामानाची पिशवी ? थांब, चहा करते . मी पाणी पिलो, पाट घेउन बसलेा. अग , मी एकटाच सायकलवर आलो, सामान आणलेच नाही. मला प्रथम काहितरी खायला दे, मग चहा घेतेा.ति. बाबा शाळेतच असतील ना ? थोडेसे पोटात ढकलून ,चहा घेऊन सायकलनेच शाळेत पोहोचलो. शाळा बंद करून ति. बाबा घरीच निघाले होते . मला सायकलवरून उतरतांना पाहताच , तू सायकलवरून एकटाच ? कसा ? एवढे तांतडीचे कोणते काम आहे? शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व गुरूजन ,हायस्कुलसाठी वर्गणी गोळा करायला बाजूच्या गावात गेले आहेत .
मी घरी जाता जाता ति. बाबांना थोडक्यात माझी अकरावीची मँट्रिकची फी भरायची आहे, ति. मोठेमामा दाैर्यावर आहेत,फी उद्या सोमवारीच भरायची आहे, वेळ नाही.त्यासाठीच मी तांतडीने सायकलवरून आलो , मामाच्या घरी कोणालाही माहिती नाही, आजच परत अकोल्याला जायचे आहे. सकाळीच ९ वाजता एकटाच निघालो, जवळ पैसे नाहीत, कोठेही न थांबता आलो. ति. बाबांच्या लक्षात सर्व परिस्थिति आली. मुख्याध्यापक श्री. हाते गुरूजीहि गांवात नाहीत, जाता जाता श्री. रामेश्वरशेटजींना त्यांनी सगळी परिस्थिति समजाऊन सांगीतली. त्यांनी ताबडतोब ५० रूपये काढून दिले. प्रथम श्री. हाते गुरूजींच्या घरी निरोप ठेवला.घरी ति. सोै. आई काळजीत होती, आमची दोघांची वाट पाहत होती. घरी पोहोचलो, सायंकाळचे ७ वाजले होते. शेवटची मोटारगाडी रात्री ८.३० वाजता होती. ति. सोै. आईचा स्वयंपाक तयारच होता. आम्ही तिघेही जेवलो, तयारी केली . मोटार-स्टँडवर सायकल घेऊन पोहोचलो.
शेवटच्या गाडीवर सायकल टाकली ति. बाबा आणि मी गाडीत बसलो. रात्री १०.३० ला मामांच्या घरी पोहोचलो.मला धड चालताही येत नव्हते . माझी बसायची जागा अगदी हुळहूळ झाली होती. मामांच्या घरी सगळेच फार फार काळजीत होते.खिडकीत टेबल-लँप बांधून अंगणात ऊजेड केला होता. सगळेच खूप काळजीत होते. आम्हा दोघांना पाहून त्या सगळयांचा जीव भांड्यात पडला.
मामांच्या घरी मी सायकलवर एकटाच मेडशीला गेलो ,ही गोष्ट माझ्या देशमुख नावाच्या मित्राकडून कळली , नी आजीच्या काळजाचे ठोके वाढले. आजी मोठ्या मामीला घेवून लहान पुलाजवळच्या धोब्याच्या घरी गेली. तो पंचागातून हरवलेल्या/अचानक गांवाला गेलेल्या व्यक्तिबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधून सांगायचा.आजीने माझे नांव सांगून , मी केाठे ? कसा आहे ? सुखरूप घरी परत कधी येईल ? असे प्रश्न विचारले.त्याने विनोद सुखरूप आहे, तो आजच परत येईल. आजी आणि मेठ्या मामी घरी परत आल्या. आता फक्त वाट पाहत घरी थांबणे हातात होते.सर्वांना माझा खूप राग आला, काळजीहि वाटत होती.
मी मात्र मनातून खूप घाबरलेलो होतो. पण ति. बाबांनी आजीला ३० रूपये दिले , विनोदने खूप मोठी चूक केली आहे, त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगीतल्या, जवळ एकही पैसा नसतांना एकटयाने, घरी कोणालाही न सांगता सायकलने ३० मैल मेडशीला यावयास नको होते.दैवाची कृपा म्हणून रस्त्याने येतांना पातूरच्या २ मैल घाटात कोणी लुटले नाही. मागच्या पंधरवाड्यात तलाववाडीच्या घाटात एका व्यक्तिचा खून करण्यात आला होता. भविष्यात तो अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही.
मीही माझ्या चुकांसाठी सर्वांची पाया पडून माफी मागीतली.सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.मामाच्या घरीही कोणी जेवले नव्हते. सर्वांची जेवणे झाल्यावर ,सगळे झोपलो.
सकाळी चहा-नास्ता झाल्यावर ति. बाबा मेडशीला परत गेले,ति. साै. आई घरी एकटीच होती ना ! सोमवारी एच. एस. एस. सी. परिक्षेचा अर्ज भरला ,परिक्षेची फी वर्गशिक्षकांकडे जमा केली. आता मला प्रिलीमनरी आणि फायनल परिक्षेची तयारी करावयाची होती. आम्ही मित्रमंडळींनी फक्त ४ तासच झोपायचे ठरविले. त्याप्रमाणे रात्रंदिवस विषयवार वेळात्रक तयार करून अभ्यास सुरू केला. फिजिक्स, केमिस्ट्रीच्या नोटबुक्स पूर्ण करून त्यावर गुरूजींच्या स्वाक्षरी करून घेतल्या.त्याला ‘ ए ‘ ग्रेड मिळाली. मग जोमाने लेखी परिक्षेची तयारी सुरू केली. मागील ३ वर्षाच्या प्रश्न – पत्रिका मिळविल्या .त्यातून महत्वाचे प्रश्न निवडले,घड्याळ समोर ठेवून ३ तासात प्रश्नपत्रिका- प्रमाणे उत्तर पत्रिका लिहिण्याचा सराव सुरू केला.
ह्याचा फायदा मला प्रिलीम- परिक्षेतही झाला. वर्गात पहिल्या ७ क्रमांकात मी आलो. शाळेतील गुरूजनांच्या आणि घरच्यांच्यासुध्दा अपेक्षा वाढल्या. पण बोर्डाच्या परिक्षेचे पेपर्स बाहेरिल परिक्षक तपासतात, असे आमच्या गुरूजींनी सांगितलेले होते़. ह्याशिवाय उत्तरपत्रिका कडक रितीने तपासल्या जातात. ह्याच्या परीणामस्वरूप मार्कांची टक्केवारी शाळेपेक्षा बरीच खाली येते. प्रॅक्टीकल परिक्षेचे मार्कही विचारात घेतले जातात. फायनल परिक्षेचे वेळापत्रक आले . त्याप्रमाणे प्रॅक्टिकल परिक्षा झाली. त्यासाठी बाहेरील परिक्षक आले होते. काही दिवसातच लेखी परिक्षा होती . दरम्यान जागरणाचा परिणाम प्रकृतिवर झाला होता. सवय नसल्याने तब्यतीची कुरबूर सुरू झाली. त्याला न जुमानता अभ्यास सुरू होता.
फायनलची लेखी परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. आता अभ्यासाचे टेन्शन संपले. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या . रिकामा वेळ कसा कारणी लावायचा ? बाबुजी देशमुख वाचनालयात सकाळ सं ध्याकाळ वर्तमानपत्रे वाचनाचा मार्ग सुचला.नवनवीन मित्र मिळाले. ” EARN WHILE YOU LEARN ” संबंधीचा लेख वाचनात आला. ति. मोेठे मामांची परवानगी घेतली. प्रयत्न सुरू केले.
अकोला रेल्वे स्टेशन जवळच्या जठार पेठेतील Berar Oil Industry ला भारतीय लष्कराच्या Ordinance Factory कडून दारूगोळयांचे डब्ब े बनवून पुरविण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याची बातमी वाचली. त्यासाठी २ रूपये ५० पैसै प्रती दिवसाप्रमाणे मेहनताना मिळणार होता. त्यातील ३० पैसे वैद्यकीय उपचाराचे वजा जाता दर ८ दिवसानंतर १७ रूपये ६० पैसे हातात मिळणार होते. ति. मेाठेमामांची परवानगी घेतली. काम सुरू केले, माझ्या प्रमाणे जवळजवळ १५० व्यक्ति कामाला लागले. ४५ दिवसानंतर सदर कंत्राटाचे काम संपले .
दरम्यानच्या काळात मला माझ्या शाळेतील मित्र कावळे भेटला. त्याने पाण्याच्या टाकी जवळच्या M.S .E B. कार्यालयात स्टोअर्स विभागात Clerk ची नोकरी मिळाल्याचे सांगितले. मीही प्रयत्न करायचे ठरविले. सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना भेटायला गेलो. चाैकशी करता श्री.काघलकर , कार्यकारी अभियंता, फार कडक स्वभावाची व्यक्ति आहे. त्यांचा हवालदार होता विठ्ठल राव ,त्यांनी मला धीर दिला.मी श्री. काघलकर साहेबांची परवानगी घेवून आत गेलो. त्यांनी मला बसायला सांगून टाईम्स ऑफ इंडीया वाचायला दिला, नी स्वतः कामात मग्न झाले. १५ मिनिटानंतर श्री. काघलकर,साहेबांनी मला पेपरात वाचलेल्या बातम्यातील सर्वात महत्वाची बातमी विचारली . “रशियाचे पंतप्रधान माननीय श्री.ख्रृश्चेव्हांचा, युनोत उगारलेल्या जोड्यासह फोटो” आणि त्याची सविस्तर बातमी त्यांना सांगितली. त्यांनी स्टेाअर्स इन्चार्ज श्री. झोपाटेंना ताबडतेाब बोलावले. श्री.झोपाटेसाहेब घाबरेघुबरे होऊन आले. श्री. काघलकर साहेबांनी ” ‘लोणकरांना कामावर रूजू करून घेऊन ४ दिवसांचा कामाचा अहवाल द्या, समाधानकारक अहवाल असेल तर त्यांना कामावर सुरू ठेवून पगार देवू .नाहीतर पगार न देता घरी पाठवा.”असे सांगितले.येथे ३ रूपये प्रति दिन प्रमाणे रोजंदारी मिळेल असे सांगितले. एकंदर ४५ दिवस उन्हाळ्यात काम केले.
काॅलेज विश्व नागपूर विद्यापीठ
H.S.S.C. 1961 March चा बोर्ड परिक्षेचा निकाल आला . मी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेा. काॅलेज – प्रवेशाचे सर्वांना वेध लागले.