कॉलेज शिक्षण – नागपुर विद्यापीठ

त्यावेळी नागपूर विद्यापीठाला सपीठाची चाळणी म्हणत.विदर्भात गव्हाचे पीठअगदी बारीक चाळायला लागणार्या चाळणीला “सपीठाची चाळणी ” म्हणतात. नागपूर विद्यापीठाच्या परिक्शांचे निकाल अतिशय कडक लागत.१५ टक्केच् मुले उत्तीर्ण म्हणजे खूपच चांगला निकाल समजला जाइ एकेका वर्गात १०० विद्यार्थ्यापैकी फक्त १० टक्के विद्यार्थि कॉलेजमध्ये उत्तीर्ण होणे ही चांगल्या कॉलेजचे लक्षण समजत.ह्या बाबींचा विचार ति.मोठेमामांनी केला.मी अकरावी पास असल्याने सरळ प्रथम वर्ष विज्ञानला प्रवेश घेता आला असता. परंतु सर्वानुमते प्रि युनिव्हर्सिटी विज्ञानला प्रवेश घेतला.अकरावीत सर्व विषयाचे माध्यम मराठी होते. आता कॅालेजमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. येथे वर्गात १०० विद्यार्थी होते. वेगवेगळे प्राध्यापक येवून त्या त्या विषयाचे लेक्चर देत, तुम्हाला सगळे समजले का ? समजले नसल्यास पुन्हा विचारा असेहि सांगत. पण आदरयुक्त भीतिने आणि एवढ्या सगळ्या समोर मी एकटाच कसा विचारू ? सगळे विद्यार्थी हसतील ! त्यापेक्षा सगळ्याप्रमाणे आपणही गुपचूप बसाणे योग्य वाटे. मग लेक्चर संपले की प्राध्यापक हाॅलमधून निघून जात . पण घरी गेल्यावर त्या त्या विषयाचे पुस्तक उघडले की काही काही समजत नसे. आता ह्यावर उपाय काय ? शाळेत गुरूजी प्रत्येकाला नांव घेवून समजले काय ? आपुलकीने विचारीत . मग मला शाळेतील श्री. जोग गुरूजींची प्रकर्षाने आठवण आली. स्वयं – अध्यापनाची सवय लाव ! पुढील आयुष्यात फार उपयोग होईल. मग मला त्यावेळीं घेतलेल्या Dictionary ची आठवण झाली. पुन्हा Science dictionary विकत घेतली. स्वयं अध्यापन सुरू झाले.ह्या काॅलेजमध्ये शिकवायला सर्व प्राध्यापक श्री.जोशी, देशमुख, सरनाईक, नागनाथ, पटवर्धन, श्रीमती नांदे यायच्या सगळ्यांचे आवडते होते जोशी व पटवर्धन. जेाशीसर प्रिन्सिपल तर होतेच पण N.C. C. Incharge ही होते.माझी एन.सी.सी.चे प्रशिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. काॅलेजमध्ये एन .सी. सी. “बी” सर्टिफिकेट मिळाले. नागपूरला खदान येथे ८ दिवसाचा कॅंप सुध्दा केला. पातूर जवळ फायरींगला खरी ३०३ रायफल होती . परंतु माझ्या बाजुच्या मुलाला नजरचुकीने डमी रायफल दिली गेली होती . सर्वांनी ५ काडतुसेही लोड केली. टारगेटवर लक्ष केंद्रीत करून फायरचा हुकूम मिळतांच बंदुकीचा घोडा-चाप ओढला, सर्वांनी गोळी झाडली नी अचानक ईमर्जनसी शिट्यांचा कल्लोळ झाला. फायरींग थांबविले गेले. तपासणी केली गेली, डमी रायफलचा ताबा घेतला गेला. पुढील फायरींग सुरू झाले.मातीच्या उंचवटयावर लाईंग पोझीशनमध्ये होतो म्हणून आम्हा कोणालाही कोणतिही इजा झाली नाही.डमी रायफलमधून सुटलेली गोळी आमच्या पाचही जणांच्या अंगावरून गेली हेोती.रायफलमधून सुटलेली गोळी ज्या वेगाने पुढे जाते त्याच वेगाने रायफल मागे येत असते, हे लक्षात घेता रायफल खांदयाला घट्ट दाबून ठेवावी लागते नाहीतर खांदाच निखळण्याचा संभव असतो.

एन.सी.सी.नागपूर कँप
एन.सी.सी.चा नागपूर येथे ८ दिवसाचा कँप ठरला नी सर्वांची मन् आनंदून गेली.हा कँप खदान येथे आयोजित करण्यात आला होता.मिलीट्रीसारखाच होता हा एन. सी. सी.चा कँप .टेंटमध्ये राहायचे, प्रत्येकाने आपापले काम स्वतःच करायचे .दैनिक दिनक्रमाप्रमाणे सकाळी ४ वाजताच उठायचे ,प्रातर्विधी आटेापून ,टमरेल भरून चहा घेवून तय्यार राहायचे. ५ वाजता जॉगींगला २ मैल जाऊन यायचे. नंतर अर्ध्या तासात नास्ता, चहा घेऊन पूर्ण ड्रेस घालून परेडसाठी हजर राहायचे. एक तासाने परत टेन्ट मध्ये यायचे. दोन तासात स्नानादी कार्यक्रम झाला की बौध्दीक चालायचे ११ वाजेपर्यत. जेवण , विश्रांती चालायची दुपारी ४ वाजेपर्यंत,मग ट्रेनिंग आणि खेळ . ५ वाजता शहरात फेरफटका मारायला सुटी,पण रात्री ९ वाजेपर्यंतच , उशीर झाला ,कोडवर्ड विसरला तर ! पकडले जाऊन मिलीटरी टाईप शिक्षा ठरलेली. १) पाठीवर झोपून दोन्ही पाय उंच सरळ ठेवायचे, पायाला आधार द्यायचा नाही पण पाय खाली आले तर पार्श्वभागावर केनचे फटके बसायचे.
२)क्राउलींग म्हणजे पोटावर झोपून हाताच्या ढोपरावऱ पुढेपुढे चालायचे….इ.

आमच्या कॉलेजमध्ये बेरार ऑइल इंडस्ट्रीच्या मँनेजरची मुलगी श्यामला बालसुब्रम्हण्यम माझ्या वर्गात होती. ती फ्रॉक घाालून ,चष्मा लावून कॉलेजमध्ये येत असे.तिला प्रत्येक विषयाच्या पेपर मध्ये ८० टक्याच्य वरच मार्क मिळत असत.ती युनिव्हर्सिटीत प्रत्येक वर्षी मेरीट पहीली यायची . तिला सर्व विषयाची शिष्यवृति मिळत असे. प्रथम वर्ष बी .एस.सी. पासून एम.एस.सी. पर्यंत दर वर्षी त्यांची घोडदौड सुरूच राहिली. पुढे आय. ए.एस., आय.पी. एस., आय. एफ .एस. च्या केन्द्रीय लेाकसेवा आयेागाच्या परिक्षेतही प्रथम आली. तिने आय.एफ. एस. ची निवड केली. तिची स्विट्झरलँड मघ्ये charge the affairs म्हणुन नेमणुक झाली.

कॉलेजमधल्या गंमती

आमच्या कॉलेजमध्ये एकाच वर्गात त्रैवार्षिक,पंचवार्षीक योजनेेप्रमाणे वाटचाल करणारे भागडे, पाटील सारखे अनेक विद्यार्थी होते.साहजिकच त्यांना पिरीअड बंक करून बाहेर एन्जॉय करण्यात जास्त रसअसायचा . सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेणार्या फक्त ३ च मुली होत्या.कु.देव, कु. चिपळुणकर आणि कु .बालसुब्रम्ह्ण्यम . वर्ग कसला हॉलच होता,त्यात एका बाजूला कोपर्यात तिन्ही मुली बसायच्या.बडोद्याच्या मोठ्या व प्रसिध्द सायन्स काॅलेजमध्ये बरीच वर्षे हेड ऑफ दि फिजीक्स डिपार्टमेंट राहिलेल्या एका सिनिअर प्राध्यापकांना , शेगावच्या संत गजानन महाराजांचा स्वप्नात आदेश मिळाला. त्याप्रमाणे ते अकोल्याच्या सीताबाई आर्टस काॅलेज मध्ये फिजीक्स डिपार्टमेंटला आले होते . अध्यात्मिक वृत्तिचे हे प्राध्यापक अंगावर विभुतिचे पट्टे लावून लुंगी घालूनच प्रयेागशाळेत बसत असत.त्यांना फिजीक्समधील कोणत्याही विभागातील, कोणताही प्रश्न कधीही विचारला तरी तरी त्याचे निरसन विनाविलंब करीत.तसेच रसायन शास्त्राचे मुख्य प्राध्यापक श्री. पटवर्धनांनी सांगीतले होते. मला केव्हाही ,कोठेही ,रसायनशास्त्रातील केाणत्याही भागावरील कोणताही प्रश्न कधीही विचारा. अकोला रेल्वे स्टेशनवरून येतांना आम्हा ४-५ जणांना श्री.पटवर्धनसर भेटले, आम्ही त्यांना आमची रसायनशास्त्रातील अडचण सांगीतली. त्यांनी तेथेच रस्त्याच्या बाजूला दगडावर बैठक मारली नी विचारलेल्या प्रश्नाचे सेेाप्या भाषेत निरसन करणे सुरू केले ४५ मिनिटानंतर , आणखी काही विचारायचे आहे ? आम्ही सर्वांनी त्यांचे मनापासून आभार मानले. थोड्याच अंतरावरील रेस्टॉरेंटमध्ये सर्वजण फ्रेश झालेा.आम्हाला इंग्रजीसाठी श्री. बी.एन.झांबरे सर होते , त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाण्यासारखे होते.त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा Elocution and Debate स्पर्धेत भाग घ्यायला लागलो.त्यांनी मला तसे प्रमाणपत्र दिले होते,ते मी आजतागायत जपून ठेवले आहे.
त्यावेळीआमच्या कॉलेज मध्ये कु शिंदे,ही जिल्ह्याधिकारी , अकोला यांची मुलगी कला विभागात शिकत होती. कॉलेजच्या वार्षीक स्नेहसंमेलनात ह्याच मुलीने सिनेमातील एक पूर्ण गाणे शिट्टीवर म्हटले होते. त्यावेळी ज्येष्ठ गायीका सुलोचनाबाईंच्या पार्टीचाही गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

एकदा यवतमाळच्या कॉलेजचे प्राचार्य आणी विश्वस्त असलेले प्रसिध्द मराठी शायर श्री. भाऊसाहेब पाटणकर ,यांचा शायरीचा कार्यक्रम १९६२-६३ मध्ये आमच्या कॉलेजमध्ये आयेजित करण्यात आला होता. शायरीचा कार्यक्रम म्हणताच , मुली उठून बाहेर जायला लागल्या, आयोजित पाहुणे अत्यंत रागाने उभे राहिले नी दरडावून म्हणाले ,” कोणीहि बाहेर जायची गरज नाही, शायरीत आक्षेपार्ह असे काहिही नसते फमक्त हलके-फुलके, मनाला आनंदून टाकणारे विनोद असतात.” मलाही जबादारीची जाणीव आहे,मीसुध्दा माझ्या कॉलेजचा प्राचार्य व विश्वस्त ही आहे. सर्व मुली परत जागेवर येउन बसल्या.कार्यक्रम सुरू झाला.

कॉलेज कुमारांसाठी:
केसास वेुव्हज,आम्ही फेस पावडर लावतो !
बुशकोट जसा, ब्लावूज आम्ही घालतो !!

पेड वेणीचे, करू नकोस मागे पुढे !
आम्ही तरी कितीदा,पहायचे मागेपुढे !!

वृध्दांसाठी:
अरे म्रृत्यो , येतास जर का तू सांगुनी !
तर बघितले असते , केाण तू ,अन् कोण मी !!

एकदा मेल्यावरी,मी परतुनी आलो घरी !
तेच होते दार आणि तीच होती ओसरी !!

हेाती तिथे तसबीर माझी , भिंतीवरी टांगली !
खूप होती धूळ आणी कसर होती लागली !!

हॉलमधून एक हात वर झाला,उभे राहून उस्फुर्ततेने बोलला,

मित्रांसाठी:
गर्दीत लागला धक्का, पण होता मऊ !
मी म्हटले , सॉरी ss, तिने म्हटले थँक्युss !!

हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला .असा हा मजेदार ,मनोरंजनात्मक कार्यक्रम नंतर ३-४ तास चालला. सर्वांच्या मनातील शायरी ह्या प्रकाराबाबतचे गैरसमज दूर झाले.शायरी सर्वांना स्वत: करावीशी वाटली . सिनेमा पाहिल्यावर आवडलेले गाणे जसे प्रत्येकजण गुणगुणतच बाहेर पडतो, तसेच काहिसे शायरीच्या कार्यक्रमाचे झाले.

बी.एस.सी. ची वार्षिक परिक्षा झाली. नागपूर विद्यापीठाचा निकाल १७ %लागला.तर कॉलेजचा निकाल ९ % च लागला. ज्याची मला भिती वाटत होती तसेच झाले. माझा organic केमिस्ट्री हा विषय राहीला.

माझ्या आयुष्यातील शाळा-कॉलेजमध्ये जावून शिकण्याचा एकूण १३ वर्षाचा कालावधी संपला.
पुढे काय !? करायचे !?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो , सगळा खर्च करीन .” तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल. त्यानंतर संधी मिळताच ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
” आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच ,प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , िववाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे. ”

!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)