पुढे काय!?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून ति.मोठेमामांनी , आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो, सगळा खर्च करीन. तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल.” त्यानंतर संधी मिळताच त्यांनी ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
“आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच, प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , विवाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे”
त्याच दरम्यान जिल्हा परिषद, अकोला ,ची ‘अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक’ पदांसाठी जाहिरात आली होती .ति.मोठेमामा पश्चिम वर्हाड विभागात , सुपरिन्टेडेटचे ,स्वीय सहाय्यक ,होते .त्यावेळी त्यांना सर्व शाळांच्या तपासणीसाठी जावे लागायचे .त्यामुळे गावोगावच्या प्राथमिक शिक्षकांना ,त्या गावच्या पुढार्यांकडून मिळणार्या , हरकाम्या व्यक्तिसारखी अपमानास्पद ,वागणूक दिली जाते , ह्याची कल्पना होती .गुरूजींना मिळणारी आदराची वागणूक दिली जात नाही. ह्याची जाणीव असल्याने , शिक्षकाच्या नोकरीस पसंती नव्हती . परंतू सर्वच गावात ,सरसकटपणे अशी वागणूक दिली जात नाही , हेही मान्य होते. त्यामुळे त्यांच्या संमतिनंतरच , मी अप्रशिक्षीत प्राथमिक शिक्षकाच्या जागेसाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतला . त्याकाळी सरळ निवड व्हायची .माझा नेमणुकीचा आदेश मेडशीच्या पत्यावर गेला .ति. रा.रा.बाबा तेा आदेश घेऊन अकोल्याला आले. अर्ज केल्यापासून चार महिन्यानंतर नेमणुकीचे आदेश निघाले होते.
मला ‘घुसर ‘ पंचायत समिती, अकोला, येथे जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेवर ‘जादा शिक्षक’ या पदावर नेमणूक , शिक्षणाधिकारी जि. प. अकोला ,यांच्या लेखी आदेशाप्रमाणे देण्यात आली. ‘ घुसर ‘ हे गाव अकोला येथून ८ मैलावर होते . अकोला रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आपातापा रोडवर घुसर हे गांव होते . सदर रस्ता कच्चा होता , रस्त्यात दोन तीन खोल नाले होते . पलिकडल्या वा अलीकडल्या काठावरच्या कोणालाही नाल्यातला माणूस दिसत नसे . मी एकटाच सायकलने घुसरला निघालो . सुटीचा दिवस तसेच दुपार असल्याने रस्त्याने क्वचितच माणसे दिसत . गावांत पोहोचलो ,तो समोरच शाळा दिसली . त्याचवेळी मी समोरच्या व्यक्तिकडे मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजींची चौकशी केली .योगायोगाने मी ज्यांना विचारले तेच मुख्याध्यापक श्री . मानकरगुरूजी होते .त्यांना मी माझ्या ‘ जादा शिक्षक ‘ म्हणून घुसरला नेमणूक झाल्याचे सांगीतले . त्यांनी मला उद्या शनिवारी दि .२८/ १२/१९६३ रोजी सकाळी शाळेवर रूजूं होण्यासाठी होण्यासाठी येण्याचा सल्ला दिला . घरी परत आल्यावर मी घरी घुसरला जाऊन आल्याचे सांगीतले . ति .गं .भा .आजीच्या जुन्या आठवणीप्रमाणे घुसर हे खूप खार्या पाण्याचे गांव आहे . तेथे फक्त एकच तलाव आहे .सदर तलाव उन्हाळ्ळयात आटतो .

त्यावेळी अकोला येथे जिल्हा ऑलींपिकचे खेळ सुरू हेाते . मी दुसर्याच दिवशी, दिनांक २८ डिसेंबर १९६३ हया दिवशी घुसरला शाळेत कामावर रूजूं होण्यासाठी निघालो . जातांना मला डाबकी रोडवरचे माझ्या ओळखीचे पोस्टाचे सुपरवायझर भेटले .त्यांनाही पोस्ट तपासायला घुसरलाच जायते होते . ते वृद्ध असून पुढच्या सहा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते .आम्हा दोघांनाही घुसरला जाण्यासाठी एकमेकाची सोबत होणार होती . पोस्टाचा चार्ज शाळेच्या मुख्याध्यापकांकडेच होता . ते मला म्हणाले मी तुमच्या मुख्याध्यापकांना तुम्ही माझ्या सोबत आल्याने उशीर झाला असे सांगीन . आम्ही दोघेही घुसरला सकाळी ८.३० ला पोहोचलो . तेथे पोहोचल्यावर ते पोस्टाचे सुपरवायझर काहीच बोलले नाहीत .तेथे सिनिअर ग्रामसेवक श्री ,टापरेसाहेब बसलेले होते . त्यांनी माझा नेमणुकीचा आदेश पाहताच मुख्याध्यापकांना श्री . लोणकर गुरूजींची नेमणूक कोणात्या गुरूजींच्या जागेवर झाली आहे ,ह्यचाा खुलासा होत नाही. आपल्या शाळेतील श्री . पागरूत डॉक्टर गुरूजींनी राजीनामा दिला आहे . पण श्री .लोणकर गुरूजींची नेमणूक ‘जादा शिक्षक’ पदावर झाली आहे .त्यांना श्री .पागरूत गुरूजींच्या जागी कसे रूजू करून घेणार ? आपण जादा शिक्षकाची मागणीही केली नाही . तुम्ही आता ह्यांना शाळेत कामावर कसे काय रूजू करून घेणार ? पंचायत समितिच्या साहेबांकडून ह्यांना स्पष्ट खुलासा करून , घेऊन येण्यास सांगावे अले मला वाटते . आता ‘जादा शिक्षक ‘ शब्दाचा अर्थ लक्षात न आल्याने ,मला मुख्याध्यापकांनी , कामावर रूजू करून घेण्यास नकार दिला . तसेच मला श्री .टापरेंनी सुचविल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी कडून योग्य तो खुलासा करून , घेऊन आल्यावरच मी तुम्हाला रूजू करून घेईन . मला आता काय करावे ? सुचले नाही.दुसरे दिवशी रविवार असल्याने पंचायत समिती /जिल्हा परिषद कार्यालयही बंद असणार होते . लगेचच्या कामाच्या दिवशी मी ,”मुख्याध्यापक, म. मा.शाळा , घुसर,पं .स.अकोला , ह्यांनी , मला कामावर रूजू करून घेण्यास , नकार दिला . हा आपल्या आदेशाचा ‘ अवमान ‘ करण्यात आला आहे , तरी आता योग्य तो आदेश तांतडीने देण्याची कृपा करावी ” , असा विनंतीवजा, तक्रार अर्ज, शिक्षणाधिकारी , जि. प. अकोला यांचेकडे घेऊन गेलो .

त्या दिवशी उप- शिक्षणाधिकारी, श्री. पुराणिकसाहेबांचे कार्यालयात सकाळी कार्यालय सुरू होण्याची वेळ होती .त्याचवेळी सहाय्यक उपशिक्षणाधिकारी, श्री. आमलेसाहेबांना , तांतडीचा फोनआला.” श्री. पुराणिकसाहेबांना Heart Attack आला आहे ,ताबडतोब या. माझा अर्ज वाचून ”श्री.आमलेसाहेबांनी ,पत्र लिहून ,त्या पत्रावर स्वाक्षरी केली , पाकीट बंद करून मला घुसरच्या मुख्याध्यापकांचा पत्ता लिहायला सांगून ते पाकीट त्यांना त्वरीत नेवून द्यायला सांगितले , नी स्वत: पुराणिक साहेबांच्या घरी तांतडीने गेले.
मी ते बंद पाकीट त्याच दिवशी , श्री.मानकर, मुख्याध्यापक , मराठी माध्यमिक शाळा , घुसर . ह्यांना नेवून दिले . त्यांनी ते पत्र वाचताच ,त्यांचा चेहरा पडला ,थरथरत्या हातांनी ,शिक्षकांचा हजेरीपट काढून माझेजवळ दिला . पत्रातील आदेशाप्रमाणे मला दिनांक २८डिसेंबर १९६३ रोजी रूजू झाल्याची सही ,हजेरीपटात करायला सांगितली .थोड्या वेळाने पाणी पिऊन झाल्यावर ,” तुम्हाला रुजू करून न घेता परत पाठविले , ही माझी मोठी चुकच झाली .”असे कबूल केले . त्यानंतर तसे स्पष्टिकरण करणाऱे पत्र (१ ) शिक्षणाधिकारी, जि. प. अकोला ,आणि (२) संवर्ग विकासअधिकारी ,पंचायत समिती ,अकोला, ह्यांना उलट टपाली पाठविले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)