मामा घरी – मुक्काम अकोला

अकोला येथेच नाही तर संपुर्ण सोनार समाजात सर्वश्री.हिंगणेकर, ठोसर आणि उज्जैनकर ह्या त्रिमुर्तीच्या शब्दाला खुप मान होता. कोण्त्याही प्रसंगात त्याचा सल्ला मोलाचा मानला जात असे.पश्चिम वर्हाड विभागाच्या शिक्षण खात्यात श्री. हिंगणेकरमामा स्विय सहाय्यक पदावर होते.डॉक्टर ठोसर, अकोला सिटी सिव्हील कोर्टात स्विय सहाय्यक होते. श्री.उज्जैनकर अकोल्याला पंजाब नशनल बँकेत होते.डॉक्टर ठोसर,श्री.उज्जैनकर हे श्री.हिंगणेकरमामांचे नात्याने मामा होते पण ते जीवलग मित्रांसारखे वागत.

अकोल्याला आल्यावर मामांनी माझी पहिल्या वर्गाची तयारी करुन घेतली. घराजवळील दाबकी रोड म्युनिसिपल प्राथमिक शाळा क्रमांक( ८),मध्ये, मुख्याध्यापक, श्री.विद्यावाचस्पतीजींनी परीक्षा घेउन मला सरळ दु‌‌सर्‍या वर्गात प्रवेश दिला.माझे प्राथमिक शिक्षण चवथ्या वर्गापर्यंत ह्याच शाळेत झाले.तेथे मला अरुण उपश्याम आणी बाळु डिडोळकर हे दोन मित्र मिळाले.आम्ही वर्गात तिघेही एकामागे एक असे बसत होतो. मोठया हिंगणेकरमामांना मुलबाळ नव्ह्ते. लहान मामांचे लग्न झाले नव्ह्ते. आजी, मामी दोन्ही मामांचा मी फार लाडका होतो. सगळ्यांच्या मताने माझे ‘महादेव’ हे नाव बदलून “विनोद” असे ठेवण्यात आले. आमच्या शेजारी पातुर्ड्याचे सप्रे कुटुंबीय राह्त होते. त्यांची मुलगी “शशी” राहत होती. ती माझ्या आईची लहानपणापासून मैत्री होती. ह्या शशी मावशीचा मी फार लाड्का होतो. मला कडेवर घेवुन शाळेत नेणे आणणे हे काम तिने घेतले होते. ती कधी कधी मला चिमटे घेत असे,धप्पाटे घालत असे शाळेत नेतांना,पण प्रेमाने नी जबाबदारीने!

शाळेत माझे वर्गशिक्षक श्री.करकडे होते , ते फार कडक होते.त्यांची करडी नजर सगळ्यांवर असायची.त्यांच्या उभ्या छडीचा हातावरचा मार अजुनही लक्षात आहे. त्यामुळे आम्हाला लहानपणीच एक शिस्त लागली, नियमितता आली. चवथीपर्यंत माझा पहीला नंबर कायमच होता.चवथीची परीक्षा झाली.निरोप समारंभाला श्री.मत्तलवार, उपशिक्षणाधिकरी, आले होते. बक्षिस-समारंभानंतर त्यांनी पाचव्या वर्गापासुनच्या नवीनच शिकायच्या ईंग्रजीतल्या गंमती सांगितल्या.मराठीतला’ काऊ’ म्ह्णजे कावळा, ईंग्रजीतला ‘ काउ ‘म्हणजे ( मराठीत) “गाय” होईल…ई.नवीन नवीन गंमती जमती ईंग्रजी भाषेत शिकायच्या आहेत, असा संदेश दिला.

त्यानंतर ऊन्हाळ्याची सुटी लागली.आता शाळेतील सवंगडी रोज भेटणार नाहीत.नवीन शाळेत,नवीन गणवेष घालुन जायला मिळणार आहे.नवीन सवंगडी भेटणार आहेत.ह्या शाळेत आल्यावर सुरवातीची प्रार्थना”नमितो तुज शारदे…..”.किती सुंदर विद्यादेवीला केलेले वंदनच असायचे.पहिलीतील मुलांना अगदी सहज गुण गुणायला लावणारी कविता-गाणे” यू यू यू पपी,पपी,! आपण खेळू लपाछपी….,!” आणि “अमुचा हा मध्यप्रांत ,गहु/बाजरी/कापुस हा पिकवी……!.”सगळे फक्त आठवत राहायचे.

मध्यप्रांताचा वर्हाड (आत्ताचा विदरभ) म्ह्णजे अकोला ,बुलढाणा,अमरावती,वर्धा ,नागपूर,गोंदीया,चांदा(चंद्रपूर),आणि यवतमाळ हे आठ जिल्हे मिळुन होणारा भूभाग होता.मोठे हिंगणेकर मामा ह्या विभागाच्या शिक्षण-अधिक्षकांचे स्विय-सहाय्यक होते.त्यांचे सोबत नेहमी शाळा तपासणीसाठी जात असत.त्यांतील सर्वश्री.आपटे व्ही. ए.,बक्षी,दाणी,आपटे टि.ए.,तनखिवाले,….ई.नावे मला अजुनही लक्षात आहेत,कारण ह्या सगळयासोबत मोठेमामांचे खुप चांगले संबंध होते.

प्राथमिक शिक्षण पुर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी माझे नाव अकोल्यातील सगळ्यात मोठया आणी सर्वोत्तम अशा शासकीय बहुऊदयेशीय माध्यमिक शाळेत घातले.दाबकी-रोड वरील घर ते स्टेशन जवळील शाळा ही जवळ-जवळ चार मैल अंतरावर होती.मी ह्या शाळेत पायी चालत यायचो.माझे वर्ग-शिक्षक श्री.अरगडेगुरुजी होते.नवीन सवंगडी मिळाले.ही शाळा खुप मोठी होती.शंभर वर्ग-खोल्या होत्या.पाचवी त अकरावी प्रत्येकी तीन-तुकडया मिळुन पंधराशे विद्यार्थी होते.अकोल्यातील प्रतिष्ठीत नागरीकांचीच,वकील,डौक्टर,अधिकारी,उदयोगपती,…..ईत्यादिंच्याच मुला-मुलींनाच ह्या शाळेत प्रवेश दिला जाई.पण नोहेंबर महिन्यात कांजण्याने मी आजारी पडलो,महिन्यानंतर शाळेत जाऊ लागलो.पण अश्क्ततेमुळे मला त्रास होत होता.ही बाब मोठे मामांच्या लक्ष्यात आली.त्यांनी विचार करुन माझी शाळाच बदलली.घराजवळच्याच सितामाता मंदिराजवळच्या युनियन हायस्कुलमध्ये मी जाऊ लागलो मला ह्या. शाळेत मागे झालेला सगळा अभ्यास भरुन काढायचा होता.येणार्या परीक्षेत वरच्या क्रमांकाने ऊत्तीर्ण व्हायचे होते.मुख्याध्यापक श्री. कुळकर्णीं गुरुजींनी मला प्रोत्साहनच दिले.सहामाही परिक्षेत माझा पहीला नंबर आला.वार्षिक परिक्षेतही तो कायम राहीला.घरी मामा,मामी,आजी…सर्वांची मने आनंदून गेली.

उन्हाळ्याच्या सुटीनंतर युनियन हायस्कुल,शहर शाखा स्टेशवनजवळच्या न्यु ईंग्लिश हायस्कुल, मुख्य शाखेत विलीन करण्यात आली.त्यामुळे मी पुन्हा स्टेशनजवळ न्यु ईंग्लिश हायस्कुलमध्ये जायला लागलो, सहाव्या वर्गात ! येथे वर्गशिक्षक श्री.निपाणकर गुरुजी, जतकर गुरुजी, कांतगुरुजी,बक्षी गुरुजी, …ई.होते.प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक होते खेळायल मोठ्ठे मैदान होते.मी आठव्या वर्गापर्यंत ह्याच शाळेत होतो.न्यु ईंग्लिश हायस्कूलच्या दोन आठ्वणी आहेत.

(१) आमच्या शाळेची सहल पारस-नागझरी-शेगांवला गेली होती.पारस हे कोळ्शावर चालणारे विदयुत केंद्र आहे.जवळच नदी आहे त्यावेळी हे केंद्र पुर्णपणे तयार झाले नव्हते.ते बघितल्यावर आम्ही नदी काठाकाठाने चालत चालत गाणी म्ह्णत नागझरीला पोहोचलो.दुपारची वेळ झाली होती. नागझरीला गोमाजी महाराजांची समाधी आहे.गोमुखातून गंगेचे पाणी पडते म्ह्णतात.ह्या धारेखाली सर्वांनी आंघोळी केल्या. सोबत आणलेले डब्बे काढून अंगत-पंगत करीत जेवणे झाली.गोमाजी महराजांनी त्यांच्या हाताच्या ढोपराने खणलेल्या सुमारे ५०० फुट लांब गुहेतील समाधीचे १०-१० च्या गटाने जाऊन दर्शन घेतले. श्री.जतकर गुरुजींनी दोन गाणी म्हट्ली, (१)”रे हिंद बांधवा,थांब ह्या स्थळी,अश्रु दोन ढाळी! ईथेच विसावली ती राणी झांशीवाली.तसेच हिंदीतू (२)हमने तो, कलीयाऍ मांगी,काटोंका हार मिला !

सर्वजण गहिवरले, जवळ्च्याच, कड्क ऊन्हाळ्यातही न आटणार्या प्रसिध्ध झर्याच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन ताजेतवाने झालो.ऊन्हे ऊतरली, नी सर्वजण शेगांवच्या मार्गाला लागलो.सायंकाळी शेगांवला पोहोचलो.

दुसरी आठवणः-आठव्या वर्गात आसतांना गांधी-जयंतीला भाषणाची स्पर्धा होती. मराठी, हिंदी, संस्कॄत, ईंग्रजी….ईत्यादितून बोलायचे होते. श्री.निपाणकर गुरुजींनी माझी ईंग्रजीतुन भाषणाची तयारी करून घेतली.भाषण स्पर्धेत पहिला नंबर गांधीजीं विषयी संस्कॄत- भाषणाला, ईंग्रजी-भाषणाला दुसरा, तर हिंदी-भाषणाला तिसरा क्रमांक देण्यात आला. मला त्यावेळी ‘नदी शेवटी सागरालाच मिळेल…आणि ‘फुलाची- गोष्ट’ मिळुन एक पुस्तक मिळाले. हे पुस्तक मी अजुनही जपून ठेवलेले आहे
माध्यमिक शिक्षण:-

त्यावेळी १० वी लोअर मॅट्रीक दोन वर्ष तर ११वी हाय्यर मॅट्रीक तीन वर्षाचा असे दोन अभ्यासक्रम शासनाने जाहीर केले.मी ११ वी हाय्यर मॅट्रीकला शासकीय बहुऊद्देशीय उच्च माध्यमिक शाळा, अकोला रेल्वे स्टेशन जवळच्या शाळेत प्रवेश घेतला. तेथे ९ व्या वर्गात प्रवेशासाठी तेथील श्री.पाटील गुरुजींनी बुध्धिमापन- निवड-परीक्षा घेतली. त्यानुसार कला,विज्ञान,व्होकेशनल-टेक्निकल,वाणिज्य ह्यापैकी ‘विज्ञान’ शाखेत मला प्रवेश मिळाला. आठव्या वर्गात माझा चारही सेक्शन मिळून दुसरा क्रमांक आला होता.नवीन शाळेत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते. इंग्रजी,मराठी-संस्कृत,गणित, विज्ञान,सुतारकाम यासाठी अनुक्रमे श्री.जोग गुरूजी,श्री.माटे गुरूजी, श्री.काळे गुरूजी, श्री.देशपांडे गुरूजी,श्री.शहाणे गुरूजी होते.येथे स्वयंअध्यापन कसे करावे हेही शिकावयास मिळाले.ह्याशिवाय जवळच्या बी. एड.कॅालेजमधून श्री.फेगडे गुरूजी,श्रीमती कुळकर्णी,श्री.अरगडे गुरूजी अनुक्रमे गणित, मराठी, इतिहास-नागरीकत्व शिकवायला यायचे. श्री.अंजनकर गुरूजी एन.सी. सी. ला होते.श्री.जोग गुरूजींनी इंग्रजीचा अभ्यास करतांना स्वयंअध्ययन पध्दतीने करायला शिकवीले़. विषयातील कठीण भाग, कठीण शब्द शोधायला, डिक्शनरी कशी वापरायची हे शिकविले. इतर विषयासाठीसुध्दा ह्या पध्दतिचा वापर करता येतो हेही सांगीतले . भविष्यात ह्याचा उपयोग करण्याचा हेही सांगितले.श्री. माटे गुरूजींनी वर्गातील सर्व विद्यार्थांना संस्कृत आणि हिंदी परीक्षांना बसविले. श्रीमती कुळकर्णीबाईंनी शिकविलेली भावस्पर्शी अशी श्री. साने गुरूजींची “आई” ही कविता आम्ही कधीही विसरणे शक्य नाही.

नवीन शाळा खूपच मोठी होती.एकुण शंभरहून जास्त वर्ग खोल्या, फिजिक्स, केमिस्ट्री, जीवशास्त्र, टॅक्निकल, सुतारकाम, लोहारकामासाठी वेगवेगळ्या खोल्या होत्या. खेळायला मोठे मैदान, सगळे खेळ खेळण्याचे साहित्य, जिल्हा-ऑलिम्पीक मैदान होते.येथे ९ वी,१० वी तसेच ११ वीचे प्रत्येकी ४-४ सेक्शन होते.माझ्या वर्गात लोथे, पुराणिक, नाकाडे , चौधरी, ही खुप श्रीमंतांची मुले होती. त्यांना सुरवातीपासूनच शिकवणी होती.माझी स्पर्धा ह्याच मुलांशी होती.मला शिकवणी तर खुप दुर पुस्तकाचे गाईड शब्दही माहिती नव्हता दाबकी-रोड ते शाळा हे ४ मैलाचे अंतर कधी कधी मामांच्या सायकलवर तर कधी पायीच चालत यावे लागायचे. शाळेत एन.सी.सी./ए.सी.सी.ची प्रशिक्षणाची सोयही होती.शनिवार/रविवार सकाळी त्याचे ट्रेनिंगचे वर्ग असायचे.त्यावेळी मी लहान दिसत होतो. मला एन.सी.सी.त घेतले नाही.मला खुप वाईट वाटले.तसेच मला अजिंठा-वेरूळ सहलिला जाता आले नाही. वयाने लहान असल्याने क्रिकेट,हाॅकी….. ई. खेळातही भाग घेता आला नाही.

माझे नवीन मित्र लोथे, पुराणीक,चैाधरी, नाकाडे, मोहरील सर्वजण ह्याच शाळेत पाचव्या वर्गापासून शिकत होते.ह्या सगळ्या खूप हुषार मुलांशी माझी स्पर्धा होती. आता पर्यंत शाळेत शिक्षक जातीने लक्ष देत , अभ्यास करवून घेत ,वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे . ह्या शाळेत प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक होते. वेळापत्रका प्रमाणे त्या त्या विषयाचे शिक्षक येवून शिकवून जात़. होमवर्क देवून जात. दुसर्या दिवशी ते तपासून परत मिळायचे. सर्व गुरूजनांचे माझ्या प्रगतीवर प्रत्येक तिमाही परीक्षेनंतर बारकाईने लक्ष ठेवून असायचे. ति.हिंगणेकरमामा मधूनमधून कामानिमीत्य दैार्यावर जात असत. त्यांचेही माझ्या प्रगतीवर बारकाईने लक्ष असायचेच. श्री.जाेगगुरूजी आणि श्री.देशपांडेगुरूजींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयाचा सेल्फ स्टडी कसा करायचा हेही शिकत होतो.

वार्षीक परिक्षा झाली.नववीत ऊत्तीर्ण होऊन दहावीत गेलो. पण पहिल्या दहा मध्येही माझा नंबर आला नाही. त्यावेळीच सर्वदूर फ्लुुची साथ आली होती. फ्लुवर कोणतेही परीणामकारक औषध आधुनिक वैद्यकशात्रात उपलब्ध नव्हते. अशावेळी औषधोपरासाठी अायुर्वेदकशात्र,होमिओपॅथीचे धर्मार्थ दवाखाने जागोजागी उघडण्यात आले. प्रत्येक घरातील व्यक्ती एकामागेामाग आजारी पडायला लागले. मोठेमामांकडेही एकापाठोपाठ एक आजारी पडले. त्यावेळी फक्त मोठेमामांनी घरातील प्रत्येकाला औषधे , चहा- पाणी-बिस्कीटे….ई. जागेवरच नेऊन दिली. आलेले पाहुणेही आजारी झाले.

दहावीत असतांना आमच्या शाळेच्या स्न्हसंमेलनाच्या निमित्ताने दिव्याचा इतिहास,तसेच आधुनिक दिवे कसेआले ह्याचे प्रदर्शन करायचे आम्ही ठरविले . अति प्राचीन काळी मानव जंगलातच राहायचा. प्राण्यांना मारून त्यांचे कच्चेच मांस खायचा. कंद – मुळे , जंगलातील मिळतील ती फळे खायचा . शिजविण्याचा प्रकार माहितीच नव्हता . त्याकाळी जंगलात वणवा पेटला . त्यांत प्राणी , पशुपक्षी भाजल्याने मृत्यू पावले . मानवाने दुसरे काही खायला नसल्याने ते तसेच खाल्ले . त्याला त्याची चव रूचकर लागली . नंतरच्या काळात वणवा कसा लागतो याचा त्याने कसून शोध घेतला . त्याला कळले की , दोन झाडे वादळात एकमेकावर जबरदस्त घासल्याने ठिणगी पडून अग्नि तयार झाला .जंगलाला आग लागली . अशा तर्हेने अग्निचा शोध लागला . नंतर नदीकाठी भटकतांना देोन गारगोट्या एकमेकावर घासल्यानेही अग्निची ठिणगी तयार होते , हेही कळले .

प्राणी , मासे ह्यांच्यी चरबीतून तेलासारखा पदार्थ मिळतो , त्यापासून दिव्याचा शोध लागला . हळूहळू मशाल , लँप , कंदीलाचा शोध लागला . त्यानंतर पेट्रोमँक्स गँसबत्ती , गँस वेल्डींग आल्यावर , वेल्डींग करतांना आवश्यक अशा ऑक्सीअँसिटिलीन गँसवर आधारित दिवे आले . नंतर वीजेवर चालणारे दिवे आले नी फार मोठी क्रांती झाली . ट्युब लाइटचेही कित्येक आकारीतील दिवे आले . महागड्या कंपन्यांच्या जाहिरातीसाठी न्यऑन साईंन्सचा उपयोग होऊ लागला . क्ष-किरण , गँमा , बीटा किरणांचा , आणी आता लेसर किरण क्रांती घडवीत आहेतच . माझ्या गटाकडे ऑक्सी अँसिटिलीन लँपचे प्रोजेक्ट मिळाले . त्याकाळी सायंकाळनंतर आईस्क्रीम , कुलफी विकणारे ,फेरीवाले , हा लँप त्यांच्या टोपलीवर पक्का बांधायचे . हा लँप सोसाट्याच्या वारा लागला तरी विझत नसे . आमच्या गटाने ह्या फेरिवाल्यांच्या सहकार्याने तसा ऑक्सीअँसीटिलीन लँप प्रदर्शनासाठी बनऊन घेतला .
आमचे हे दिव्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी अकोला शहरातूनच नव्हे तर पंचक्रोशीतून लोक आले होते . सर्वांना हे प्रदर्शन खूपखूप आवडले .

नववी, दहावी पास झाल्यावर अकरावीत प्रवेश घेतला. अकरावी म्ह्णजे नागपूर बोर्डाची,हाय्यर सेकंडरी सर्टिफीकेट परीक्षा होती. परीक्षेची कसून तयारी करायची होती. किमान लायब्ररी लावणे फार आवश्यक होते..त्यासाठी वर्गणीसह पंधरा रुपये हवे होते. ऊन्हाळ्यात गावी भोनला गेलो होतो. तेथे नरहरी आजोबा, रामचंद्रकाका, सदशिवकाका कोणीही पंधरा रुपयाची आर्थीक मदत केली नाही. पण लेाणकर घराण्यातील किमान एकजण तरी घराबाहेर-शहरात शिकून पुढे जायला पािहजे अशी केारडी सहानुभूतीमात्र व्यक्त केली.नाइलाजाने रिक्तहस्ते परत आलेा.शेवटी क्रमीक पुस्तक, होमवर्क नोटस, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गमित्रांची मदत घेतली. रात्रंदिवस मेहनत करायला लागलो. फक्त २-३ तास झोपायचे. शाळेच्या prilimanary परीक्षेत पहिल्या सातमध्ये आलो.

वेडगळ- साहस:-
H.S. S.C.बोर्डाच्या परीक्षेचा फॅार्म भरायचा होता. मोठेमामा दैार्यावर जबलपूरला गेले होते.८-१० दिवसांनी येणार होते. घरी आजी/मोठ्यामामी कोणाजवळही ३० रूपये परिक्षा -फीचे पैसे नव्हते. परिक्षा फी ४ दिवसात भरणे आवश्यक होते. कोणालाही पैसे मागणे शक्य नव्हते.काय करावे?? जवळ पैसे नव्हते .
त्यावेळी एकच मार्ग सुचला! सैा. आई आणी बाबा भोन हे गांव सोडून नैाकरी निमित्ताने अकोल्यापासून ३० मैलावर मेडशी ता. वाशीम येथे शाळेत लागले होते. गावापेक्षा परिस्थिती बरी होती. त्यांच्याकडे जाऊन पैसे आणावे असा विचार केला. पण घरी आजी- मामीला कसे सांगायचे? अकोल्यापासून ८-१० मैलावर शिंदखेडला महाशिवरात्रीला महा देवाची यात्रा होती. घरी सायकल होतीच. १-२ मित्रांना डबलशीट-डबलपायडल करीत जायचेसाठी विचारले. पण कोणीही तयार झाले नाही.शेवटी शनिवारी सकाळीच एकट्याने च मेडशीला ३० मैैल सायकलने जायचे ठरविले. त्यावेळी खाजगी मोटार-सर्ह्विस भुरमल, नटवरच्याा गाड्या होत्या, मोटारभाडे एकेरी ३ रू. होते. पण जवळ त्याचीही सोय नव्हती.
शेवटी एकट्यानेच सायकलने निघालो. प्रत्येक १० मैलावर विहीरीवर पाणी तर पिता येईल. मेाटारने १-२ तासात मेडशीला पोहोचता येते . सायकलने जातांना पातूरनंतर २ मैलाची घाट-चढण विचारात घेता ४-५ तासात मेडशीला पोहोचता येईल असा विचार केला. सकााळीच ९ वाजता अकोल्याहून निघालो. १०-१० मैलावर पाणी पिऊन विश्रांती घेत-घेत दुपारी ४ वाजता घाट-चढणीला सुरवात केली. मेडशीच्या अगोदर २ मैलावर तलाव-वाडीच्या लहान घाटात एक आठवडाअगोदरच एका व्यक्तिचा खून झाल्याचे पेपरमध्ये वाचले होते. ह्या घाटा अगोदरच मेडशीच्या श्री. नारायण मंत्री (मारवाडी) यांचे शेत होते .