कॉलेज शिक्षण – नागपुर विद्यापीठ

त्यावेळी नागपूर विद्यापीठाला सपीठाची चाळणी म्हणत.विदर्भात गव्हाचे पीठअगदी बारीक चाळायला लागणार्या चाळणीला “सपीठाची चाळणी ” म्हणतात. नागपूर विद्यापीठाच्या परिक्शांचे निकाल अतिशय कडक लागत.१५ टक्केच् मुले उत्तीर्ण म्हणजे खूपच चांगला निकाल समजला जाइ एकेका वर्गात १०० विद्यार्थ्यापैकी फक्त १० टक्के विद्यार्थि कॉलेजमध्ये उत्तीर्ण होणे ही चांगल्या कॉलेजचे लक्षण समजत.ह्या बाबींचा विचार ति.मोठेमामांनी केला.मी अकरावी पास असल्याने सरळ प्रथम वर्ष विज्ञानला प्रवेश घेता आला असता. परंतु सर्वानुमते प्रि युनिव्हर्सिटी विज्ञानला प्रवेश घेतला.अकरावीत सर्व विषयाचे माध्यम मराठी होते. आता कॅालेजमध्ये शिक्षणाचे माध्यम इंग्रजीच होते. येथे वर्गात १०० विद्यार्थी होते. वेगवेगळे प्राध्यापक येवून त्या त्या विषयाचे लेक्चर देत, तुम्हाला सगळे समजले का ? समजले नसल्यास पुन्हा विचारा असेहि सांगत. पण आदरयुक्त भीतिने आणि एवढ्या सगळ्या समोर मी एकटाच कसा विचारू ? सगळे विद्यार्थी हसतील ! त्यापेक्षा सगळ्याप्रमाणे आपणही गुपचूप बसाणे योग्य वाटे. मग लेक्चर संपले की प्राध्यापक हाॅलमधून निघून जात . पण घरी गेल्यावर त्या त्या विषयाचे पुस्तक उघडले की काही काही समजत नसे. आता ह्यावर उपाय काय ? शाळेत गुरूजी प्रत्येकाला नांव घेवून समजले काय ? आपुलकीने विचारीत . मग मला शाळेतील श्री. जोग गुरूजींची प्रकर्षाने आठवण आली. स्वयं – अध्यापनाची सवय लाव ! पुढील आयुष्यात फार उपयोग होईल. मग मला त्यावेळीं घेतलेल्या Dictionary ची आठवण झाली. पुन्हा Science dictionary विकत घेतली. स्वयं अध्यापन सुरू झाले.ह्या काॅलेजमध्ये शिकवायला सर्व प्राध्यापक श्री.जोशी, देशमुख, सरनाईक, नागनाथ, पटवर्धन, श्रीमती नांदे यायच्या सगळ्यांचे आवडते होते जोशी व पटवर्धन. जेाशीसर प्रिन्सिपल तर होतेच पण N.C. C. Incharge ही होते.माझी एन.सी.सी.चे प्रशिक्षण घेण्याची तीव्र इच्छा होती. काॅलेजमध्ये एन .सी. सी. “बी” सर्टिफिकेट मिळाले. नागपूरला खदान येथे ८ दिवसाचा कॅंप सुध्दा केला. पातूर जवळ फायरींगला खरी ३०३ रायफल होती . परंतु माझ्या बाजुच्या मुलाला नजरचुकीने डमी रायफल दिली गेली होती . सर्वांनी ५ काडतुसेही लोड केली. टारगेटवर लक्ष केंद्रीत करून फायरचा हुकूम मिळतांच बंदुकीचा घोडा-चाप ओढला, सर्वांनी गोळी झाडली नी अचानक ईमर्जनसी शिट्यांचा कल्लोळ झाला. फायरींग थांबविले गेले. तपासणी केली गेली, डमी रायफलचा ताबा घेतला गेला. पुढील फायरींग सुरू झाले.मातीच्या उंचवटयावर लाईंग पोझीशनमध्ये होतो म्हणून आम्हा कोणालाही कोणतिही इजा झाली नाही.डमी रायफलमधून सुटलेली गोळी आमच्या पाचही जणांच्या अंगावरून गेली हेोती.रायफलमधून सुटलेली गोळी ज्या वेगाने पुढे जाते त्याच वेगाने रायफल मागे येत असते, हे लक्षात घेता रायफल खांदयाला घट्ट दाबून ठेवावी लागते नाहीतर खांदाच निखळण्याचा संभव असतो.

एन.सी.सी.नागपूर कँप
एन.सी.सी.चा नागपूर येथे ८ दिवसाचा कँप ठरला नी सर्वांची मन् आनंदून गेली.हा कँप खदान येथे आयोजित करण्यात आला होता.मिलीट्रीसारखाच होता हा एन. सी. सी.चा कँप .टेंटमध्ये राहायचे, प्रत्येकाने आपापले काम स्वतःच करायचे .दैनिक दिनक्रमाप्रमाणे सकाळी ४ वाजताच उठायचे ,प्रातर्विधी आटेापून ,टमरेल भरून चहा घेवून तय्यार राहायचे. ५ वाजता जॉगींगला २ मैल जाऊन यायचे. नंतर अर्ध्या तासात नास्ता, चहा घेऊन पूर्ण ड्रेस घालून परेडसाठी हजर राहायचे. एक तासाने परत टेन्ट मध्ये यायचे. दोन तासात स्नानादी कार्यक्रम झाला की बौध्दीक चालायचे ११ वाजेपर्यत. जेवण , विश्रांती चालायची दुपारी ४ वाजेपर्यंत,मग ट्रेनिंग आणि खेळ . ५ वाजता शहरात फेरफटका मारायला सुटी,पण रात्री ९ वाजेपर्यंतच , उशीर झाला ,कोडवर्ड विसरला तर ! पकडले जाऊन मिलीटरी टाईप शिक्षा ठरलेली. १) पाठीवर झोपून दोन्ही पाय उंच सरळ ठेवायचे, पायाला आधार द्यायचा नाही पण पाय खाली आले तर पार्श्वभागावर केनचे फटके बसायचे.
२)क्राउलींग म्हणजे पोटावर झोपून हाताच्या ढोपरावऱ पुढेपुढे चालायचे….इ.

आमच्या कॉलेजमध्ये बेरार ऑइल इंडस्ट्रीच्या मँनेजरची मुलगी श्यामला बालसुब्रम्हण्यम माझ्या वर्गात होती. ती फ्रॉक घाालून ,चष्मा लावून कॉलेजमध्ये येत असे.तिला प्रत्येक विषयाच्या पेपर मध्ये ८० टक्याच्य वरच मार्क मिळत असत.ती युनिव्हर्सिटीत प्रत्येक वर्षी मेरीट पहीली यायची . तिला सर्व विषयाची शिष्यवृति मिळत असे. प्रथम वर्ष बी .एस.सी. पासून एम.एस.सी. पर्यंत दर वर्षी त्यांची घोडदौड सुरूच राहिली. पुढे आय. ए.एस., आय.पी. एस., आय. एफ .एस. च्या केन्द्रीय लेाकसेवा आयेागाच्या परिक्षेतही प्रथम आली. तिने आय.एफ. एस. ची निवड केली. तिची स्विट्झरलँड मघ्ये charge the affairs म्हणुन नेमणुक झाली.

कॉलेजमधल्या गंमती

आमच्या कॉलेजमध्ये एकाच वर्गात त्रैवार्षिक,पंचवार्षीक योजनेेप्रमाणे वाटचाल करणारे भागडे, पाटील सारखे अनेक विद्यार्थी होते.साहजिकच त्यांना पिरीअड बंक करून बाहेर एन्जॉय करण्यात जास्त रसअसायचा . सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेणार्या फक्त ३ च मुली होत्या.कु.देव, कु. चिपळुणकर आणि कु .बालसुब्रम्ह्ण्यम . वर्ग कसला हॉलच होता,त्यात एका बाजूला कोपर्यात तिन्ही मुली बसायच्या.बडोद्याच्या मोठ्या व प्रसिध्द सायन्स काॅलेजमध्ये बरीच वर्षे हेड ऑफ दि फिजीक्स डिपार्टमेंट राहिलेल्या एका सिनिअर प्राध्यापकांना , शेगावच्या संत गजानन महाराजांचा स्वप्नात आदेश मिळाला. त्याप्रमाणे ते अकोल्याच्या सीताबाई आर्टस काॅलेज मध्ये फिजीक्स डिपार्टमेंटला आले होते . अध्यात्मिक वृत्तिचे हे प्राध्यापक अंगावर विभुतिचे पट्टे लावून लुंगी घालूनच प्रयेागशाळेत बसत असत.त्यांना फिजीक्समधील कोणत्याही विभागातील, कोणताही प्रश्न कधीही विचारला तरी तरी त्याचे निरसन विनाविलंब करीत.तसेच रसायन शास्त्राचे मुख्य प्राध्यापक श्री. पटवर्धनांनी सांगीतले होते. मला केव्हाही ,कोठेही ,रसायनशास्त्रातील केाणत्याही भागावरील कोणताही प्रश्न कधीही विचारा. अकोला रेल्वे स्टेशनवरून येतांना आम्हा ४-५ जणांना श्री.पटवर्धनसर भेटले, आम्ही त्यांना आमची रसायनशास्त्रातील अडचण सांगीतली. त्यांनी तेथेच रस्त्याच्या बाजूला दगडावर बैठक मारली नी विचारलेल्या प्रश्नाचे सेेाप्या भाषेत निरसन करणे सुरू केले ४५ मिनिटानंतर , आणखी काही विचारायचे आहे ? आम्ही सर्वांनी त्यांचे मनापासून आभार मानले. थोड्याच अंतरावरील रेस्टॉरेंटमध्ये सर्वजण फ्रेश झालेा.आम्हाला इंग्रजीसाठी श्री. बी.एन.झांबरे सर होते , त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाखाण्यासारखे होते.त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा Elocution and Debate स्पर्धेत भाग घ्यायला लागलो.त्यांनी मला तसे प्रमाणपत्र दिले होते,ते मी आजतागायत जपून ठेवले आहे.
त्यावेळीआमच्या कॉलेज मध्ये कु शिंदे,ही जिल्ह्याधिकारी , अकोला यांची मुलगी कला विभागात शिकत होती. कॉलेजच्या वार्षीक स्नेहसंमेलनात ह्याच मुलीने सिनेमातील एक पूर्ण गाणे शिट्टीवर म्हटले होते. त्यावेळी ज्येष्ठ गायीका सुलोचनाबाईंच्या पार्टीचाही गाण्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.

एकदा यवतमाळच्या कॉलेजचे प्राचार्य आणी विश्वस्त असलेले प्रसिध्द मराठी शायर श्री. भाऊसाहेब पाटणकर ,यांचा शायरीचा कार्यक्रम १९६२-६३ मध्ये आमच्या कॉलेजमध्ये आयेजित करण्यात आला होता. शायरीचा कार्यक्रम म्हणताच , मुली उठून बाहेर जायला लागल्या, आयोजित पाहुणे अत्यंत रागाने उभे राहिले नी दरडावून म्हणाले ,” कोणीहि बाहेर जायची गरज नाही, शायरीत आक्षेपार्ह असे काहिही नसते फमक्त हलके-फुलके, मनाला आनंदून टाकणारे विनोद असतात.” मलाही जबादारीची जाणीव आहे,मीसुध्दा माझ्या कॉलेजचा प्राचार्य व विश्वस्त ही आहे. सर्व मुली परत जागेवर येउन बसल्या.कार्यक्रम सुरू झाला.

कॉलेज कुमारांसाठी:
केसास वेुव्हज,आम्ही फेस पावडर लावतो !
बुशकोट जसा, ब्लावूज आम्ही घालतो !!

पेड वेणीचे, करू नकोस मागे पुढे !
आम्ही तरी कितीदा,पहायचे मागेपुढे !!

वृध्दांसाठी:
अरे म्रृत्यो , येतास जर का तू सांगुनी !
तर बघितले असते , केाण तू ,अन् कोण मी !!

एकदा मेल्यावरी,मी परतुनी आलो घरी !
तेच होते दार आणि तीच होती ओसरी !!

हेाती तिथे तसबीर माझी , भिंतीवरी टांगली !
खूप होती धूळ आणी कसर होती लागली !!

हॉलमधून एक हात वर झाला,उभे राहून उस्फुर्ततेने बोलला,

मित्रांसाठी:
गर्दीत लागला धक्का, पण होता मऊ !
मी म्हटले , सॉरी ss, तिने म्हटले थँक्युss !!

हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला .असा हा मजेदार ,मनोरंजनात्मक कार्यक्रम नंतर ३-४ तास चालला. सर्वांच्या मनातील शायरी ह्या प्रकाराबाबतचे गैरसमज दूर झाले.शायरी सर्वांना स्वत: करावीशी वाटली . सिनेमा पाहिल्यावर आवडलेले गाणे जसे प्रत्येकजण गुणगुणतच बाहेर पडतो, तसेच काहिसे शायरीच्या कार्यक्रमाचे झाले.

बी.एस.सी. ची वार्षिक परिक्षा झाली. नागपूर विद्यापीठाचा निकाल १७ %लागला.तर कॉलेजचा निकाल ९ % च लागला. ज्याची मला भिती वाटत होती तसेच झाले. माझा organic केमिस्ट्री हा विषय राहीला.

माझ्या आयुष्यातील शाळा-कॉलेजमध्ये जावून शिकण्याचा एकूण १३ वर्षाचा कालावधी संपला.
पुढे काय !? करायचे !?

मी लहान ५ -६ वर्षाचा असतांना ति. मोठेमामा भोनला आले होते. त्यावेळी घरची आर्थिक परीस्थिती हलाकीची होती. तसेच गांवात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती. ह्या सगळ्या परिस्थितिचा विचार करून आई-बाबांना वचन दिले. !
” मी तुमच्या मुलाला अकोल्याला शिकायला घेउन जातेा , मॅट्रिकपर्यंत माझ्याच जवळ ठेवतो , सगळा खर्च करीन .” तुम्ही दोघेही मधूनमधून भेटायला येत जा. तोपर्यंत तुमची परिस्थितिही सुधारेल. त्यानंतर संधी मिळताच ति.बाबांनाही मेडशीला शाळेत सरकारी नोकरीत लावून दिले. माझ्या शिक्षणात खंड पडला नाही. मामांकडेच राहिलो, अकरावी मॅट्रीक झाल्यावर पुढे काॅलेजमध्ये दोन वर्षे शिकलो. गांवापेक्षा मेडशीला नोकरीला असल्याने आर्थिक परिस्थितिही सुधारली होती. ह्या सगळ्या बाबींचा साकल्याने विचार केला , आई-बाबांशीही विचार- विनिमय केला.ति. मोठेमामांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते निर्णय घेतला.
” आता स्वत:च्या बळावर नोकरी करून पुढील शिक्षण घेत राहायच ,प्रगति करायची , स्वत:बरोबर भावंडांचेही शिक्षण , िववाह….इ.च्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचे. ”

!!

माध्यमिक शिक्षण..H.S,S.C.

श्री.नारायण मंत्री – मारवाडी शेतात गडी-माणसांसोबत काम करित होते. त्यांनी मला दुरूनच आवाज देऊन थांबविले. त्यांनी मला पाणी प्यायला दिले, मी घाट पीयीपयीच सायकल हातात घेऊन चढून आलेलो होतो . माझाही घसा सुकला होता. पाणी पिल्यावर बरे वाटले. संपूर्ण ३० मैल प्रवासात भेटलेली पहिली ओळखीची व्यक्ति,त्यांनी मला खूप धीर दिला. ते म्हणाले घोड्यावारच्या प्रवासासारखा सायकल प्रवास तसा बराच आरामाचा, दोन -चार पायडल मारले, उतारावर तर पायडल न मारता नुसते सीटवर बसायचे.थोडी विश्रांतीही मिळाली. तलाववाडीत रस्ता उताराचाच होता , वर चढून दोन- तीन वळणे पार केली की आमराई ,भोपळी -फुलांचा मळा नंतर खंडोबाचे देऊळ,येथे रथसप्तमीला मोठी यात्रा असते. त्यानंतरचा लहान ओढा ओलांडला की आलेच , ‘ मेडशी ‘ गांव . मोटार स्टॅंडवरून डावीकडे वळायचे, पुढे चक्कीजवळून डावीकडे वळून श्रीमती धनाबाई आंबेवालीच्या घरामागेच आमचेे घरी पोहोचलो. सायकल भिंतीला लावली,आत गेलो. ति. साै. आईसाहेबांना मी दिसताच खूप आश्चर्य वाटले. तू एकटाच ? कसा आलास ? सामानाची पिशवी ? थांब, चहा करते . मी पाणी पिलो, पाट घेउन बसलेा. अग , मी एकटाच सायकलवर आलो, सामान आणलेच नाही. मला प्रथम काहितरी खायला दे, मग चहा घेतेा.ति. बाबा शाळेतच असतील ना ? थोडेसे पोटात ढकलून ,चहा घेऊन सायकलनेच शाळेत पोहोचलो. शाळा बंद करून ति. बाबा घरीच निघाले होते . मला सायकलवरून उतरतांना पाहताच , तू सायकलवरून एकटाच ? कसा ? एवढे तांतडीचे कोणते काम आहे? शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व गुरूजन ,हायस्कुलसाठी वर्गणी गोळा करायला बाजूच्या गावात गेले आहेत .

मी घरी जाता जाता ति. बाबांना थोडक्यात माझी अकरावीची मँट्रिकची फी भरायची आहे, ति. मोठेमामा दाैर्यावर आहेत,फी उद्या सोमवारीच भरायची आहे, वेळ नाही.त्यासाठीच मी तांतडीने सायकलवरून आलो , मामाच्या घरी कोणालाही माहिती नाही, आजच परत अकोल्याला जायचे आहे. सकाळीच ९ वाजता एकटाच निघालो, जवळ पैसे नाहीत, कोठेही न थांबता आलो. ति. बाबांच्या लक्षात सर्व परिस्थिति आली. मुख्याध्यापक श्री. हाते गुरूजीहि गांवात नाहीत, जाता जाता श्री. रामेश्वरशेटजींना त्यांनी सगळी परिस्थिति समजाऊन सांगीतली. त्यांनी ताबडतोब ५० रूपये काढून दिले. प्रथम श्री. हाते गुरूजींच्या घरी निरोप ठेवला.घरी ति. सोै. आई काळजीत होती, आमची दोघांची वाट पाहत होती. घरी पोहोचलो, सायंकाळचे ७ वाजले होते. शेवटची मोटारगाडी रात्री ८.३० वाजता होती. ति. सोै. आईचा स्वयंपाक तयारच होता. आम्ही तिघेही जेवलो, तयारी केली . मोटार-स्टँडवर सायकल घेऊन पोहोचलो.

शेवटच्या गाडीवर सायकल टाकली ति. बाबा आणि मी गाडीत बसलो. रात्री १०.३० ला मामांच्या घरी पोहोचलो.मला धड चालताही येत नव्हते . माझी बसायची जागा अगदी हुळहूळ झाली होती. मामांच्या घरी सगळेच फार फार काळजीत होते.खिडकीत टेबल-लँप बांधून अंगणात ऊजेड केला होता. सगळेच खूप काळजीत होते. आम्हा दोघांना पाहून त्या सगळयांचा जीव भांड्यात पडला.
मामांच्या घरी मी सायकलवर एकटाच मेडशीला गेलो ,ही गोष्ट माझ्या देशमुख नावाच्या मित्राकडून कळली , नी आजीच्या काळजाचे ठोके वाढले. आजी मोठ्या मामीला घेवून लहान पुलाजवळच्या धोब्याच्या घरी गेली. तो पंचागातून हरवलेल्या/अचानक गांवाला गेलेल्या व्यक्तिबाबतच्या प्रश्नांची उत्तरे शोधून सांगायचा.आजीने माझे नांव सांगून , मी केाठे ? कसा आहे ? सुखरूप घरी परत कधी येईल ? असे प्रश्न विचारले.त्याने विनोद सुखरूप आहे, तो आजच परत येईल. आजी आणि मेठ्या मामी घरी परत आल्या. आता फक्त वाट पाहत घरी थांबणे हातात होते.सर्वांना माझा खूप राग आला, काळजीहि वाटत होती.
मी मात्र मनातून खूप घाबरलेलो होतो. पण ति. बाबांनी आजीला ३० रूपये दिले , विनोदने खूप मोठी चूक केली आहे, त्याने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगीतल्या, जवळ एकही पैसा नसतांना एकटयाने, घरी कोणालाही न सांगता सायकलने ३० मैल मेडशीला यावयास नको होते.दैवाची कृपा म्हणून रस्त्याने येतांना पातूरच्या २ मैल घाटात कोणी लुटले नाही. मागच्या पंधरवाड्यात तलाववाडीच्या घाटात एका व्यक्तिचा खून करण्यात आला होता. भविष्यात तो अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही.
मीही माझ्या चुकांसाठी सर्वांची पाया पडून माफी मागीतली.सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.मामाच्या घरीही कोणी जेवले नव्हते. सर्वांची जेवणे झाल्यावर ,सगळे झोपलो.
सकाळी चहा-नास्ता झाल्यावर ति. बाबा मेडशीला परत गेले,ति. साै. आई घरी एकटीच होती ना ! सोमवारी एच. एस. एस. सी. परिक्षेचा अर्ज भरला ,परिक्षेची फी वर्गशिक्षकांकडे जमा केली. आता मला प्रिलीमनरी आणि फायनल परिक्षेची तयारी करावयाची होती. आम्ही मित्रमंडळींनी फक्त ४ तासच झोपायचे ठरविले. त्याप्रमाणे रात्रंदिवस विषयवार वेळात्रक तयार करून अभ्यास सुरू केला. फिजिक्स, केमिस्ट्रीच्या नोटबुक्स पूर्ण करून त्यावर गुरूजींच्या स्वाक्षरी करून घेतल्या.त्याला ‘ ए ‘ ग्रेड मिळाली. मग जोमाने लेखी परिक्षेची तयारी सुरू केली. मागील ३ वर्षाच्या प्रश्न – पत्रिका मिळविल्या .त्यातून महत्वाचे प्रश्न निवडले,घड्याळ समोर ठेवून ३ तासात प्रश्नपत्रिका- प्रमाणे उत्तर पत्रिका लिहिण्याचा सराव सुरू केला.
ह्याचा फायदा मला प्रिलीम- परिक्षेतही झाला. वर्गात पहिल्या ७ क्रमांकात मी आलो. शाळेतील गुरूजनांच्या आणि घरच्यांच्यासुध्दा अपेक्षा वाढल्या. पण बोर्डाच्या परिक्षेचे पेपर्स बाहेरिल परिक्षक तपासतात, असे आमच्या गुरूजींनी सांगितलेले होते़. ह्याशिवाय उत्तरपत्रिका कडक रितीने तपासल्या जातात. ह्याच्या परीणामस्वरूप मार्कांची टक्केवारी शाळेपेक्षा बरीच खाली येते. प्रॅक्टीकल परिक्षेचे मार्कही विचारात घेतले जातात. फायनल परिक्षेचे वेळापत्रक आले . त्याप्रमाणे प्रॅक्टिकल परिक्षा झाली. त्यासाठी बाहेरील परिक्षक आले होते. काही दिवसातच लेखी परिक्षा होती . दरम्यान जागरणाचा परिणाम प्रकृतिवर झाला होता. सवय नसल्याने तब्यतीची कुरबूर सुरू झाली. त्याला न जुमानता अभ्यास सुरू होता.
फायनलची लेखी परिक्षा वेळापत्रकाप्रमाणे पार पडली. आता अभ्यासाचे टेन्शन संपले. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या . रिकामा वेळ कसा कारणी लावायचा ? बाबुजी देशमुख वाचनालयात सकाळ सं ध्याकाळ वर्तमानपत्रे वाचनाचा मार्ग सुचला.नवनवीन मित्र मिळाले. ” EARN WHILE YOU LEARN ” संबंधीचा लेख वाचनात आला. ति. मोेठे मामांची परवानगी घेतली. प्रयत्न सुरू केले.

अकोला रेल्वे स्टेशन जवळच्या जठार पेठेतील Berar Oil Industry ला भारतीय लष्कराच्या Ordinance Factory कडून दारूगोळयांचे डब्ब े बनवून पुरविण्याचे मोठे कंत्राट मिळाल्याची बातमी वाचली. त्यासाठी २ रूपये ५० पैसै प्रती दिवसाप्रमाणे मेहनताना मिळणार होता. त्यातील ३० पैसे वैद्यकीय उपचाराचे वजा जाता दर ८ दिवसानंतर १७ रूपये ६० पैसे हातात मिळणार होते. ति. मेाठेमामांची परवानगी घेतली. काम सुरू केले, माझ्या प्रमाणे जवळजवळ १५० व्यक्ति कामाला लागले. ४५ दिवसानंतर सदर कंत्राटाचे काम संपले .
दरम्यानच्या काळात मला माझ्या शाळेतील मित्र कावळे भेटला. त्याने पाण्याच्या टाकी जवळच्या M.S .E B. कार्यालयात स्टोअर्स विभागात Clerk ची नोकरी मिळाल्याचे सांगितले. मीही प्रयत्न करायचे ठरविले. सोमवारी कार्यकारी अभियंत्यांना भेटायला गेलो. चाैकशी करता श्री.काघलकर , कार्यकारी अभियंता, फार कडक स्वभावाची व्यक्ति आहे. त्यांचा हवालदार होता विठ्ठल राव ,त्यांनी मला धीर दिला.मी श्री. काघलकर साहेबांची परवानगी घेवून आत गेलो. त्यांनी मला बसायला सांगून टाईम्स ऑफ इंडीया वाचायला दिला, नी स्वतः कामात मग्न झाले. १५ मिनिटानंतर श्री. काघलकर,साहेबांनी मला पेपरात वाचलेल्या बातम्यातील सर्वात महत्वाची बातमी विचारली . “रशियाचे पंतप्रधान माननीय श्री.ख्रृश्चेव्हांचा, युनोत उगारलेल्या जोड्यासह फोटो” आणि त्याची सविस्तर बातमी त्यांना सांगितली. त्यांनी स्टेाअर्स इन्चार्ज श्री. झोपाटेंना ताबडतेाब बोलावले. श्री.झोपाटेसाहेब घाबरेघुबरे होऊन आले. श्री. काघलकर साहेबांनी ” ‘लोणकरांना कामावर रूजू करून घेऊन ४ दिवसांचा कामाचा अहवाल द्या, समाधानकारक अहवाल असेल तर त्यांना कामावर सुरू ठेवून पगार देवू .नाहीतर पगार न देता घरी पाठवा.”असे सांगितले.येथे ३ रूपये प्रति दिन प्रमाणे रोजंदारी मिळेल असे सांगितले. एकंदर ४५ दिवस उन्हाळ्यात काम केले.
काॅलेज विश्व नागपूर विद्यापीठ
H.S.S.C. 1961 March चा बोर्ड परिक्षेचा निकाल आला . मी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेा. काॅलेज – प्रवेशाचे सर्वांना वेध लागले.